विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादविवादामुळे चांगलाच गाजला. पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यात आज शेवटच्या दिवशी सरकारमधील शिंदे गटाने थेट ठाकरे कुटुंबियांना टार्गेट केले आहे. घोषणाबाजीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्राचे बॅनर झळकवत शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी केली. बॅनरवर आदित्य ठाकरे यांचा परमपूज्य (प.पु) असा उल्लेख करत त्यांचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले. शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंचे कार्टून असलेला बॅनर सभागृहाबाहेर झळकवत जोरदार घोषणाबाजी केली होती.
युवराजांची नेहमीच दिशा चुकली, महाराष्ट्राचे परमपूज्य (प.पू ) असा उल्लेख बॅनरवर करत आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवण्यात आली आहे. तसेच २०१४ मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली असे देखील या बॅनरवर लिहिले होते. घरात बसून पर्यटन खातं चालवलं आणि सत्ता गेल्यावर पर्यटनाची लहर आली, पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान द्यायचे. आमदार होण्यासाठी महापौर आणि दोन आमदारांची लागते कुशन असा घणाघात देखील यावेळी विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर बॅनरबाजीतून केला आहे.