Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोल्हापूर जिल्ह्यात रस्ता दुरुस्ती करता निधी मिळावा ,हसीन मुश्रीफांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
    राजकारण

    कोल्हापूर जिल्ह्यात रस्ता दुरुस्ती करता निधी मिळावा ,हसीन मुश्रीफांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रAugust 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खचले आहेत. करता हसनमुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे तर या जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर खच्चीकरण झाल्याने योग्य निधी उपलब्ध करून देण्याचे मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत असल्याने सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.

    आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, हसन मुश्रीफ, राजूबाबा आवळे, प्रा. जयंत आसगावकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी ५० कोटी, इचलकरंजी पालिकेसाठी २५ कोटी आणि जिल्ह्यातील अन्य रस्त्यांसाठी १०० कोटी असा एकूण १७५ कोटीची निधी मिळावा अशी मागणी माजी मंत्री सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.तर 25 कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या वैभववाडी, गगनबावडा अशा रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती यावेळी करण्यात आली . कोल्हापूर हा धार्मिक, पर्यटन, औद्योगिक व क्रिडा क्षेत्राच्या दृष्टीने विकसनशील जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळांबरोबरच औद्योगिक वसाहती आहेत. जिल्ह्यात एकूण 12 तालुक्यांचा समावेश असून बहुतांश तालुके हे डोंगराळ भागात मोडतात.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.