राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच सक्रीय झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आता आक्रमक झालेल्या दिसून आले. महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीका केली आहे. ठाकरे घराण्यातील वाद बाजूला ठेवून एकत्र येऊ असे देखील स्पष्ट केले.
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या’गणपती आमचा किंमत तुमची 2022′ या आयेजित उपक्रमाचे शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली . शिवसेना कोणाची, उद्धव राज एकत्र येणार का, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी टीकाटिप्पण्या केल्या. देशभरातल्या महागाईच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्रीय मंत्र्यांवर टीकाही केली आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, त्यांना जे कँटीनमध्ये तिथे फ्री मिळतं ते आधी बंद करा. जेव्हा विकत घेऊन खायला लागेल तेव्हा कळेल महागाई वाढलीय की नाही ते. गॅसपासून तुरडाळीपासून, भाज्यांपर्यंत म्हणजे शाकाहारी लोकांचं ताटही आता महाग झालंय.
तसेच, शिंदे गटामुळे शिवसेना पक्षामध्ये खूप मोठी फूट पडली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकटे पडले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?असा सवाल शर्मिला ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या की, त्यांनी साद घातली तर येऊ देत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्ष एकत्र येणार