मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे.
नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था बेकार झाली. मुंबई नाशिक प्रवासासाठी पूर्वी अडीच ते तीन तास इतका वेळ लागत होता. आता मात्र पाच ते सहा तासाहून अधिक वेळ लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
याकडे शासनाने तातडीने लक्ष दयावे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिंदू सण साजरे होतात की नाही असे वाटत होते आता मात्र सर्व सण साजरे होतील असे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने कष्टकरी, मजूर, गोरगरिबांच्या हितासाठी शिवभोजन ही अतिशय महत्वाची योजना सुरू केली होती. गोरगरीब जनतेच्या हितासाठी शासनाने ही योजना सुरू ठेवावी, तसेच शिवभजन केंद्र चालवणाऱ्या संस्थाचे थकलेले अनुदान लवकरात लवकर मिळेल असे छगन भुजबळ यावेळी सांगितले.