• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगावात ७५ फुटी तिरंगा ध्वजारोहण ; धरणगाव पालिका प्रशासनाने राजकीय पक्षांना डावलले का?

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 13, 2022
in धरणगाव, सामाजिक
0

धरणगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. परंतू या कार्यक्रमाला राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप धरणगाव पालिका प्रशासनावर केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ फुटांच्या तिरंगा ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण मुख्याधिकारी तथा प्रशासक जनार्दन पवार यांच्याहस्ते आज सकाळी करण्यात आले. परंतू असा काही कार्यक्रम होणार आहे, याबाबतची माहिती बहुतांश राजकीय पक्ष आणि नागरिकांपर्यंत पोहचवली गेली नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कार्यक्रमापासून राजकीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक वंचित राहिले, असा आरोप भाजपने केला आहे. एवढेच नव्हे तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती भाजप ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी दिलीय. असा मोठा कार्यक्रम होणार असल्याची कोणतीही माहिती नव्हती, या वृत्ताला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे. तसेच याबाबत कोणतीही माहिती वृत्तपत्र किंवा डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून मिळाली नाही. वास्तविक बघता या कार्यक्रमाची मोठी प्रसिद्धी करून जास्तीत जनसहभाग करून घ्यायला पाहिजे होता, असेही अॅड. संजय महाजन यांनी म्हटले आहे. शासनाने हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना या कार्यक्रमाची माहिती न देऊन शासनाच्या मूळ धोरणालाच हरताळ फासण्यात आली आहे. हा गंभीर प्रकार असून याबाबत आपण मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही अॅड. महाजन यांनी सांगितले.

तिरंगा ध्वजस्तंभाचे काम पूर्ण होईल, याची खात्री नव्हती. परंतू कामपूर्ण झाल्यामुळे तीन दिवस अधिक तिरंगा फडकावता येईल, या भावनेने कार्यक्रम घेतला. १५ आणि १७ ऑगस्ट रोजी संपूर्ण धरणगावच्या नागरिकांसाठी याच ठिकाणी सामुहिक राष्ट्रगीताचा कार्यक्रम घेणार आहोत. तसे निमंत्रण देखील सर्वांना दिले जाणार आहे – जनार्दन पवार (मुख्याधिकारी तथा प्रशासक, धरणगाव)

Previous Post

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेत जीवघेणा हल्ला !

Next Post

विवाहितेची स्वयंपाक घरात गळफास ; कारण गुलदस्त्यात

Next Post

विवाहितेची स्वयंपाक घरात गळफास ; कारण गुलदस्त्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group