लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । गुलाबराव पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला दोन मंत्री मिळाल्याने विकास कामांना खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे असे जळगाव ग्रामीण मतदार संघात बोलले जात आहे. ना. गुलाबराव पाटील यांनी सकाळी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धरणगाव मतदार संघातील समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साह संचारला आहे.