अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, आम्ही असताना असे दिवस आले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा अतिवृष्टी दौरावर आहेत. राज्यावर नैसर्गिक संकट आल्यावर सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे खासदार व आमदारांना एकत्र करून काम केल्यास त्याचे रिझल्ट लवकर मिळतात.मात्र दुर्दैवाने आज असे होताना दिसत नाही, अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे.
राज्याचा शेतकरी मोठ्या प्रमाणावर हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून केवळ आधार कार्ड व नुकसानीचा अर्ज घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कितीही मदतीचे आश्वासन दिले तरी संपूर्ण पंचनामे झाल्याशिवाय मदत कशी देणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. ओला दुष्काळ जाहीर करा अशी आधीच मागणी केली आहे.
शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट, शेतातील रोप गळून गेली आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले होते. मात्र, गडचिरोलीत आतील भागात जाऊ शकले नाहीत. एवढ्या दिवसात जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झालेली नाही.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतान SDRF चे निकष बाजूला ठेऊन आम्ही मदत केली होती. गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे अजित पवार म्हणाले.