मुंबई : वृत्तसंस्था
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रातील राजकीय व प्रशासकीय मंडळींच्या अशोक खरातशी झालेल्या फोन व्यवहाराचा धक्कादायक खुलासा केला आहे. दमानियाने सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक खरातशी तब्बल 17 वेळा फोनवर संवाद साधला आहे. त्यापैकी 10 कॉल्स इनकमिंग आणि 7 कॉल्स आऊटगोईंग होते, तर एकदा दोघांमध्ये तब्बल 21 मिनिटांचे संभाषण झाले.
त्याचबरोबर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातला तब्बल 177 कॉल्स केले आहेत. त्यांच्या भगिनी तृप्ती चाकणकर यांनीही 236 कॉल्स केले होते, तर माजी मंत्री दीपक केसरकरांचे विश्वासू दीपक लोंढे यांनी 189 कॉल्स केले आणि 30,579 सेकंदाचे संभाषण साधले.
दमानिया यांनी सांगितले की, या सर्व कॉल्स साधे फोन कॉल्स आहेत, व्हॉट्सएप किंवा इतर माध्यमांवरील कॉल्स यामध्ये मोजता येत नाहीत. शिवाय, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे 8 कॉल्स, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स, तर आशिष शेलार यांचा 1 कॉल देखील खरातला झाला.
सीडीआर विश्लेषणानुसार, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 33,727 सेकंदांचे मोठे संभाषण झाले आहे, जे दमानियाने खूप धक्कादायक मानले. त्यांनी म्हटले की, “एवढा वेळ कुणीही आपला गुरुशी बोलू शकत नाही, त्यामुळे यावर त्वरित चौकशी करणे गरजेचे आहे.”
सामाजिक कार्यकर्त्या दमानियाने या सर्व माहितीची कॉपी पोलिस महासंचालक, मुख्यमंत्री तसेच एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांना दिली असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामागे त्यांचा कुठलाही वैयक्तिक किंवा राजकीय हेतू नाही, तर फक्त जबाबदार नागरीक म्हणून ही माहिती शेअर केली आहे.
दमानियाचे म्हणणे आहे की, अशोक खरातला देश-विदेशातून कॉल्स येत होत्या – कतार, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस व्हर्जिन आयलँड, ओमान, ख्रिसमस आयलँड यांसह विविध ठिकाणांहून. त्यामुळे त्यांनी एसआयटीला संपूर्ण चौकशी करावी, असा आग्रह केला आहे.



