Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’
    क्राईम

    कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त विधान; ‘हिंदूंव्यतिरिक्त स्टॉल नको’

    editor deskBy editor deskMarch 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत, इतरांनी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केल्यास ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान त्यांनी केले.

    नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक व कामगारांच्या सूचीचे प्रकाशन मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यात हिंदूंकडूनच खरेदी करण्याची संकल्पना मांडली.

    यावेळी बोलताना मंत्री राणे म्हणाले की, हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, ही संकल्पना योग्य आहे. पूर्वी घारघर येथेही मी अशीच भूमिका मांडली होती. त्या वेळी माझ्या वक्तव्यावर माध्यमांनी टीका केली होती. मात्र मला त्याची पर्वा नाही. हिंदू राष्ट्रात हिंदूंबाबत बोलायचे नाही तर मग पाकिस्तान किंवा इस्लामाबादबद्दल बोलायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    तसेच कुंभमेळ्यात हिंदूंव्यतिरिक्त इतरांनी दुकाने लावू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या रमजान सुरू असून त्यांच्या अन्नपदार्थांच्या दुकानांमध्ये हिंदू आढळत नाहीत, असे उदाहरण देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    यावेळी त्यांनी पुढे बोलताना त्र्यंबकेश्वर परिसरातील एका दुकानाचा उल्लेख करत बाहेर दुकानाचे नाव वेगळे असते, मात्र आतमध्ये वेगळ्या व्यक्ती बसलेल्या असतात, असेही सांगितले. कुंभमेळ्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लक्ष ठेवण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

    दरम्यान, राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू असून लव्ह जिहादविरोधात कडक कायदा करण्यात येणार असल्याचेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले. मंत्री राणे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून त्यांच्या वक्तव्यावर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026

    वरसाडे तांड्यातील बेपत्ता तरुणाच्या खुनाचा उलगडा; प्रेमसंबंधातून पती-पत्नीने रचला कट

    March 15, 2026

    धावत्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे अँगल तुटले : वढोदा जवळ अपघातात एक ठार, तिघे जखमी

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.