Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!
    क्राईम

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    editor deskBy editor deskMarch 10, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई :  वृत्तसंस्था 

    मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे जाणवत आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, एलपीजी आणि एलएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि सामान्य नागरिकांवर होत आहे.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एलएनजी गॅसच्या कमतरतेमुळे उद्योगांना सर्वाधिक फटका बसला आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 30 कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळते. विशेषतः ऑटोमोबाईल, फार्मा आणि स्टील उद्योग या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. अनेक उद्योगांकडे फक्त दोन दिवस पुरवठा होईल एवढा गॅस साठा उरला आहे. केंद्र सरकारने गॅस वापर केवळ घरगुती एलपीजीसाठी राखीव ठेवल्याने औद्योगिक गॅस पुरवठा थांबला आहे, ज्यामुळे उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम झाला आहे.

    संभाजीनगरमधील शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा या औद्योगिक भागांमध्ये गॅस तुटवडा अधिक तीव्र झाला आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रात दररोज सुमारे 250–300 मेट्रिक टन एलएनजीची गरज असते, परंतु सध्याच्या परिस्थितीत पुरवठा विस्कळीत झाला आहे. कतारमधून येणाऱ्या द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने काही मोठ्या उद्योगांचे उत्पादन आधीच थांबले आहे. आणखी काही उद्योग बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    दरम्यान, मुंबईतील हॉटेल उद्योगही गॅस टंचाईमुळे प्रभावित झाला आहे. आहार – असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट्सच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने हा तुटवडा गंभीर मानला जात आहे. अनेक हॉटेल्सकडे फक्त आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅस साठा उरला आहे. पुढील तीन दिवसांत पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. गॅस टंचाईचा प्रश्न जास्त काळ सुरू राहिला, तर उद्योग आणि सेवाक्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो, याची चिंता व्यापारी आणि प्रशासन व्यक्त करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.