जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील घरी कोणी नसताना हर्षल उत्तम माळी (वय २२) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. २० जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीत राहणारा हर्षल माळी हा तरुण इलेक्ट्रिशीयन होता. त्याचे वडील भाजीपाला विक्रीसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी घरी एकटाच असलेल्या हर्षलने गळफास घेतला. वडील घरी आले त्या वेळी त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसले. त्या वेळी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



