लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात आज आषाढी एकादशी निमित्त एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाईचे महापूजा केले आहे. भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने त्यांना हा बहुमान मिळाला. शरद पवार यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला असून शरद पवार यांनी यु-टॅर्न घेतला आहे.
औरंगाबाद येथे शरद पवार यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बैठकीत मध्यावधी निवडणुका होतील, अश्या बातम्या समोर आल्या परंतु त्यावरही त्यांनी खुलासा केला आहे, ‘मध्यावधी निवडणुका लागतील असे मी बोललो नाही. निवडणुकांसाठी आपण तयार असले पाहिजे असे मी कार्यकर्त्यांना म्हणालो होतो’. ‘औरंगाबादच्या नामांतराबाबत सुसंवाद नव्हता, नामांतराचा निर्णय घेणार याबाबत माहिती नव्हती. विधानसभा निवडणुका तिन्ही पक्षाने एकत्रपणे लढण्याचा माझी मनस्थिती आहे. अद्याप यावर कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झालेली नाही,असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबर बंडखोरी करणाऱ्या बंडाला कोणतीही आधार नाही. त्यामुळे,ते राष्ट्रवादीवर आरोप करत आहे. औरंगाबाद,उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत आम्हाला माहित नव्हतं.हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता.राष्ट्रवादीच्या व्यासपाठीवार नामांतराबाबत चर्चा झालेली नाही,हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आम्हाला समजलं.औरंगाबादच्या नामांतरापेक्षा इतर मूलभूत प्रश्नावर लक्ष देण्याची गरज होती. पण आम्ही मंत्रिमंडळाचा भाग होतो त्यामुळे तो निर्णय आमचाही आहेच.’ असेही पवार म्हणाले.