Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावला वाहतूक कोंडीतून दिलासा? रिंग रोडसाठी खा. स्मिता वाघ यांचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्राकडे !
    जळगाव

    जळगावला वाहतूक कोंडीतून दिलासा? रिंग रोडसाठी खा. स्मिता वाघ यांचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्राकडे !

    editor deskBy editor deskDecember 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 
    जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी जळगाव शहराला वाढत्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी शहराबाह्य रिंग रोड विकसित करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्या संदर्भातील पत्र त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे.

    खासदार वाघ यांनी नमूद केले आहे की, शहराच्या मुख्य मार्गांवर वाढत चाललेला ट्रॅफिक, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क व कृषी व्यापाराला मोठी चालना मिळण्यासाठी रिंग रोडची उभारणी अत्यावश्यक झाली आहे.रिंग रोड झाल्यास शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील भार मोठ्या प्रमाणात कमी होईल तसेच शहरात येणाऱ्या बाह्य वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.या महत्त्वपूर्ण प्रस्तावासाठी डिपीआर (तपशीलवार प्रकल्प अहवाल) तयार करण्याची आणि रिंग रोडला केंद्राच्या प्रमुख पायाभूत सुविधा योजनांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. तांत्रिक सर्वेक्षण व वाहतूक तज्ज्ञांच्या अहवालाच्या आधारे हा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    रिंग रोडसाठी सुचवलेले महत्वाचे महामार्ग जोडमार्ग NH-53 (सूरत – नागपूर मार्ग),NH-753F (बूरहानपूर – औरंगाबाद मार्ग),NH-753J (जळगाव – चाळीसगाव मार्ग) तसेच प्रमुख जिल्हा मार्ग (MDR) व आंतर-जिल्हा मार्ग असतील “जळगावचा सर्वांगीण विकास हा माझा प्राधान्यक्रम असून रिंग रोड झाल्यास वाहतूक, उद्योग, सुरक्षा आणि आर्थिक प्रवाहात मोठे परिवर्तन घडेल. शहराला याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे.”

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘नाचता येईना अंगण वाकडं’; परिणय फुकेंचा वडेट्टीवारांवर घणाघात

    January 24, 2026

    सलमान खानचा आर्मी लूक व्हायरल; ‘मातृभूमी’ गाण्याने पेटवली देशभक्तीची भावना

    January 24, 2026

    ४०० कोटींच्या कथित रोख चोरी प्रकरणात अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड

    January 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.