Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी : धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक करा !
    राजकारण

    मनोज जरांगे पाटलांची मोठी मागणी : धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक करा !

    editor deskBy editor deskNovember 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या खटल्यात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करून अटक केली नाही, तोपर्यंत चार्जफ्रेमही होणार नाही, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. संतोष देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले.

    जरांगे म्हणाले की, “संतोष देशमुख यांचा खून करणाऱ्या आरोपीची आठवण धनंजय मुंडेंना भर सभेत कशी येते? याचा अर्थ आरोपी आणि मुंडे एकच आहेत. फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना सहआरोपी केले पाहिजे. मुंडेंना अटक केली तरच देशमुख यांना न्याय मिळेल; अन्यथा फडणवीस आरोपींना वाचवत आहेत, असा अर्थ होतो.”

    धनंजय मुंडेंवर टीका करत त्यांनी म्हटले की, “अजित पवारांनी मुंडेंना स्टार पंप्चर केले आहे. इतक्या नीच प्रवृत्तीच्या माणसाला पद देता? परळीतील कोणती जात त्यांनी सोडली? सर्व समाजांना या टोळीने त्रास दिला आहे. परळीत अनेक जातींना त्यांनी ग्रासले आहे.”

    पुढे ते म्हणाले, “अजित पवारांचा पक्ष चांगला आहे; पण हा नासका माणूस (मुंडे) सांभाळून ते पक्षाची प्रतिमा खराब करत आहेत. पक्षात ओबीसीचे इतर सक्षम नेते नाहीत का? दुसऱ्यांना संधी दिली तर पक्ष उंचीवर जाईल. हा नासका सांभाळण्याची गरज नाही—याला आम्हीच सरळ करतो.”

    गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी जरांगे यांनी पुन्हा सरकारला ठोस कारवाईची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचा थरार : पोस्टरबाजीने चिघळला राजकीय संघर्ष !

    December 1, 2025

    राणे बंधूंनी भाजपचा खरा चेहरा ओळखून वाद मिटवावा ; रोहित पवारांनी दिला सल्ला !

    December 1, 2025

    निवडणूक तापली : छत्रपतींच्या पुतळ्यावर टोपी घालण्यावरुन वाद !

    December 1, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.