मुंबई, प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. जनतेशी त्यांनी सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
राजीनामा देण्यापुर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यातील नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही शिवसेनेचे केवळ चारच मंत्री उपस्थित होतो, अशा शब्दात खंत व्यक्त केली.
याप्रसंगी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य आहे. शेवटी तो न्यायादेवतेचा निकाल आहे, असं अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केल.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आयुष्य सार्थकी लागलं अशी भावना आहे. कारण औरंगाबादला संभाजीनगर नाव दिलं, उस्मानाबादला धाराशीव दिले. ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो. मी मुख्यमंत्री आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भुखंड देण्याचे मान्य केलं. एखादी गोष्ट चांगली चालली की त्याला दृष्ट लागते. शिवसेनेला 56 वर्ष झाली. मी लहानपणापासून मी शिवसेना पाहतोय. रिक्षावाले, टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टी वाले, त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणले असे देखील त्यांनी सांगितले.