Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !
    Uncategorized

    राज ठाकरेंना दिला मंत्री सामंतांनी युती बाबत सल्ला !

    editor deskBy editor deskOctober 13, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना थेट सल्लाच दिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असे उदय सामंत म्हणालेत.

    ‘काँग्रेस’ला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे असल्याची राज यांची भूमिका असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. याबाबत उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरेंना उपरोक्त सल्ला दिला.

    पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे यांनी कोणत्याही युतीचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा. सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करणे हे हिंदुत्ववादी विचारांचे नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांना साजेसे ठरणार नाही.

    उदय सामंत यांनी यावेळी काँग्रेसवर आणि काँग्रेसशासित कर्नाटक सरकारवरही तीव्र शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटकात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारकडून सीमाभागातील मराठी लोकांवर अन्याय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या मूल्यांना धक्का पोहोचतो. त्यामुळे हा पक्ष कोणालाच मानत नाही, एवढा तो स्वयंभू झालेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील तीन सुवर्ण पेढ्यांतून सोन्याच्या अंगठ्या चोरणारी महिला अटकेत

    November 30, 2025

    जिल्ह्यात खुनाची मालिका संपेना : रात्रीच्या सुमारास तरुणाच्या खुनाने पुन्हा जिल्हा हादरला !

    October 6, 2025

    स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या !

    September 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.