Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव-चोपडा रस्त्याची दयनीय अवस्था : साळवा फाटा परिसरात वाहनांची चिखलात अडकलेली अवस्था; निधी असूनही दर्जाहीन कामाचे परिणाम उघड!
    धरणगाव

    धरणगाव-चोपडा रस्त्याची दयनीय अवस्था : साळवा फाटा परिसरात वाहनांची चिखलात अडकलेली अवस्था; निधी असूनही दर्जाहीन कामाचे परिणाम उघड!

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 25, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    धरणगाव – चोपडा मार्ग हा केवळ दोन तालुक्यांना जोडणारा नव्हे, तर महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनेक ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी ही एक जीवनवाहिनी ठरते. मात्र या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात कामाच्या दर्जात अत्यंत हलगर्जीपणा दिसून येत आहे.

    कालपासून पिपळे फाटा – साळवा फाटा मार्गावरील रस्त्यावर अनेक गाड्या खोल चिखलात फसल्याची दृश्ये समोर आली असून, नागरिकांना तासन्तास अडकून राहावे लागले. हा प्रकार केवळ गैरसोयीपुरता मर्यादित नसून, भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनांचे नियंत्रण सुटणे, रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होणे, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि रोजंदारीवर जाणाऱ्या मजुरांच्या वेळेची हानी ही या दुरवस्थेची गंभीर परिणामकारक रूपे आहेत.

    प्रश्न निर्माण होतो की, मंजूर निधी गेला कुठे? आणि या दर्जाहीन कामांची जबाबदारी कोण घेणार?

    या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही स्थितीत काहीच सुधारणा न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

    रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून प्रशासन कोणाच्या जीवाशी खेळतंय का?

    आवाज उठवण्याची वेळ आली आहे!
    लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधित विभागांनी तत्काळ या रस्त्याची पाहणी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धक्कादायक : दुचाकी आणि बसच्या धडकेत दुचाकीस्वार विद्यार्थी ठार !

    November 25, 2025

    धरणगावात रात्रीच्या भारनियमनने शेतकरी त्रस्त; थंडीच्या कडकडीत पाणी देण्याची रात्रपाळी

    November 24, 2025

    भाजप–राष्ट्रवादी युतीची रॅली आणि आढावा बैठक उत्साहात पार; अभूतपूर्व जनसमर्थनाचा प्रत्यय !

    November 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.