Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !
    कृषी

    कोथिंबीरचे भाव पडल्याने शेतकऱ्याने फिरविला ४ एकर शेतीवर रोटर !

    editor deskBy editor deskJuly 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    राज्यातील काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे. दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली.

    कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही निघेनात, शेवटी नाईलाज म्हणून शेतकरी दयानंद धोंडगे यांनी आपल्या कोथिंबीरच्या उभ्या पिकावरच थेट रोटर फिरवला आहे. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले असून महागाईचा बडगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बाजारभाव नाही. नुकसान भरपाई वेळेत व विमा संरक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्याला वालीच उरला नाही.

    ऐन भरात कोथिंबीरचे भाव गडगडल्याने खर्च तर दूरच, काढणीची मजुरीदेखील निघत नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा रोटर फिरवण्याची वेळ दयानंद धोंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? असा प्रश्न सतावत आहे. तर कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

    काबाडकष्ट करून चार एकर शेतामध्ये कोथिंबिरीचे पीक घेतले. चार पैसे हाताशी येतील या आशेने जीवापाड जपलेल्या कोथिंबिरीला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने एका शेतकऱ्याने निराश होऊन चक्क ४ एकर कोथिंबिरीवर रोटर फिरवल्याची दुर्दैवी घटना चाकूर येथे घडली आहे.

    दयानंद धोंडगे हे चाकुरातील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते दिवसरात्र शेतीत राबतात, त्या पिकास विविध खते, अत्याधुनिक औषधी आणि फवारणीचा वापर करून चाळीस दिवस त्याची निगा राखली. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी बाजारात कोथिंबीरच्या भावाची विचारपूस केली. कोथिंबीरचे भाव पडल्याचे लक्षात येताच शेतात केलेली मेहनत आणि त्यासाठी केलेला ४० हजार खर्च निघणार नाही, मजुरीचे पैसेही निघेनात, शेवटी नाईलाज म्हणून शेतकरी दयानंद धोंडगे यांनी आपल्या कोथिंबीरच्या उभ्या पिकावरच थेट रोटर फिरवला आहे. दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले असून महागाईचा बडगामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, बाजारभाव नाही. नुकसान भरपाई वेळेत व विमा संरक्षण नाही त्यामुळे शेतकऱ्याला वालीच उरला नाही.

    ऐन भरात कोथिंबीरचे भाव गडगडल्याने खर्च तर दूरच, काढणीची मजुरीदेखील निघत नसल्याने चक्क ट्रॅक्टरचा रोटर फिरवण्याची वेळ दयानंद धोंडगे या शेतकऱ्यावर आली आहे. शेतकऱ्याने जगायचं तरी कसं? असा प्रश्न सतावत आहे. तर कोथिंबीरला भाव नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.