Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पैसे घेऊन लग्न लावल्याचे प्रकरण ; बऱ्हाणपूर येथून महिलेला अटक
    क्राईम

    पैसे घेऊन लग्न लावल्याचे प्रकरण ; बऱ्हाणपूर येथून महिलेला अटक

    editor deskBy editor deskJuly 10, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पैसे व दागिने घेऊन जळगावच्या मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणात मीना प्रकाश बोरसे हिला बुधवारी (९ जुलै) बऱ्हाणपूर येथून अटक करण्यात आली. तिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या मुलीचे परस्पर कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून देण्यासह लग्नासाठी दिलेले पैसे व दागिने परत मिळण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तसेच कोल्हापूर येथील आशिष गंगाधरे याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने मुलीनेही दिलेल्या फिर्यादीवरून बलात्कार, पोस्को व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या शिवाय परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील प्रकरणातही गुन्हा दाखल आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “मी दादागिरी करणारच” वक्तव्याने पेटला वाद; सपोनि चौधरी नियंत्रण कक्षात

    February 20, 2026

    चौघांनी केली तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण !

    February 20, 2026

    ३२ वर्षीय तरुणाने घेतली तापी नदी पात्रात उडी !

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.