चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरखेडा येथील विनोद पुंजू पाटील (वय ४८) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून २७ रोजी सकाळी ९ वाजता स्वतःच्या शेतात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. विनोद पाटील या शेतकऱ्याची बोरखेडा शिवारात शेती आहे.
सततची नापिकी, उत्पन्न कमी तर हमीभाव नाही, यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, २ मुले असा परिवार आहे. ते पुंजू पाटील यांचे चिरंजीव तर सुरेश पाटील यांचे पुतणे व सुमित पाटील यांचे वडील होत.