जग्लाव : प्रतिनिधी
कोट्यावधी रुपयाचा चोपडा धरणगाव रस्ता मस्तवाल ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तसेच कामाच्या दर्जा न राखल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रोटवद येथील महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर अनेक वाहने खड्ड्यात घसरले असे प्रकार सातत्याने होत आहे. मस्तवाल ठेकेदार विरुद्ध प्रशासन सदोष मनुष्यदाचा गुन्हा दाखल करणार का की पाकीट घेऊन गप्प बसणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
मस्तवाल ठेकेदार ने मुरूम टाकण्याऐवजी काळी क्षार माती रस्त्यावर नेऊन ठेवली आहे तसेच कामाचा दर्जा देखील खालावला आहे अवघ्या वीस ते तीस टक्के मध्ये हे काम सुरू असून 70 टक्के प्रशासन व मस्तवाल ठेकेदाराच्या खिशात रक्कम जाणार आहे असे चित्र या रस्त्यावरील चित्र पाहता दिसते. नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष असून नागरिकांच्या उद्रेक झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. धरणगाव व चोपडा रस्त्यामध्ये कामाच्या दर्जा खालावण्यामागे कुणाचा हात आहे कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे हे लवकरच स्पष्ट होईल पण सर्वसामान्य माणसांची किती बळी हा रस्ता व मस्तवाल ठेकेदार घेणार असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. मस्त वाल ठेकेदाराविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे.