Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
    कृषी

    मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

    editor deskBy editor deskJune 14, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

    गेल्या ७ दिवसापासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

    प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. या प्रकरणी त्यांनी सरकारला परवापासून अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.

    मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना 2 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे.

    तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी सरकारला सोमवारपासून पाणी सोडण्याचा इशारा दिला होता. खरे तर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पण सरकारने आता यासंबंधी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार आहे. पण या समितीचाी अहवाल केव्हा येणार? कोणत्या तारखेला कर्जमाफीची घोषणा करणार? हे काहीही स्पष्ट नाही. या मुद्यावर मी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीत एखादा निर्णय होईपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम राखावा. कोणतेही अनुचित कृत्य करू नये. पण माझी मानसिकता आहे की, 16 तारखेपासून पाणीही सोडून द्यावे, असे बच्चू कडू म्हणालेत.

    दुसरीकडे बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपोषणामुळे काय स्थिती होते हे पाहण्यासाठी एक दिवसाचा उपवास करण्याचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक दिवस उपवास करावा. त्यानंतर आमच्या अमृता वहिनींची काय स्थिती होते हे पाहावे. यापुढे बच्चू कडू यांना अन्नत्याग करण्यास फशी पाडले, तर खबरदार. प्रहारचा कार्यकर्ता संपूर्ण मंत्रिमंडळाला अन्नत्याग आंदोलन करण्यास भाग पाडेल हा माझा शब्द आहे, असे त्या म्हणाल्या.

    बच्चू कडू पाचव्यांदा अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांना सुळावर देण्यासाठी त्यांच्या आईने त्यांना जन्माला घातले आहे का? कोणत्याही शासनाने गेंड्याची कातडी बाजूला ठेवून मातीतल्या माणसांचे कल्याण करावे. भाजप असेल किंवा काँग्रेसचे सरकार असेल सर्वांनी शेतकरी व दिव्यांग यांच्यासाठी जातपात व स्वतःचा स्वार्थ दूर ठेवावा, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.