मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईहून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल आठ ते बारा प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. सोमवार (९ जून) सकाळी घडली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना जाणाऱ्या प्रवाशांनी लोकलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत काही प्रवासी दरवाजावर उभे होते. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे संतुलन बिघडून तब्बल आठ ते बारा प्रवासी खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून, ट्रेनमधील अत्याधिक गर्दीमुळे दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले.
रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच प्रवासी संघटनांकडून अतिरिक्त गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनचा प्रवास हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकलच्या वेळा, डब्यांची संख्या वाढवून आणि दरवाजांजवळ सुरक्षा व्यवस्था ठेवल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.