Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
    क्राईम

    एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

    editor deskBy editor deskJune 8, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पाचोरा तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर येथून जवळ असलेल्या शेवाळे गावात एका वृद्ध महिलेवर निर्घृण हल्ला करून तिचा खून केल्याची घटना ५ जून २०२५ रोजी रात्री घडली. या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या संयुक्त तपासातून केवळ ४८ तासांत लागला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, गेल्या गुरुवारी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान शेवाळे गावातील श्रीमती जनाबाई महारु पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या राहत्या घरात अज्ञात इसमांनी मागच्या दरवाजातून प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर टणक हत्याराने वार करून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. तसेच त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून नेण्यात आले.

    या प्रकरणी मयत जनाबाई पाटील यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 103(1), 311, 332अ अंतर्गत गुन्हा क्रमांक 151/2025 अनुषंगाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    या गंभीर गुन्ह्याची तत्काळ दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरेश्वर पोलीस ठाण्याला तपासासाठी विशेष सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने शेवाळे गावात गोपनीय माहिती घेतली आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आले. यात साहिल मुकददर तडवी (वय २१ वर्षे), राकेश बळीराम हातागडे (वय २१ वर्षे), राजेश अनिल हातागडे (वय १८ वर्षे) सर्व रा. शेवाळे, ता. पाचोरा, जि. जळगाव या तिघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे, ते जनाबाई पाटील यांच्या घरासमोर नियमित बसत असत आणि टिंगल-टवाळ्या करीत. यामुळे जनाबाई यांनी त्यांना खडसावले होते. राग मनात धरून त्यांनी खून व चोरी करण्याचा कट रचला.

    ठरलेल्या योजनेप्रमाणे ५ जून रोजी रात्री मागच्या दरवाजातून घरात शिरून टणक हत्याराने जनाबाई पाटील यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने लंपास करून अंधारात पळ काढला.

    ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा व पिंपळगांव हरेश्वर पोलिसांच्या विविध अधिकाऱ्यांचा सहभाग होता. यामध्ये प्रमुख अधिकारी व कर्मचारी खालीलप्रमाणे: स्थानिक गुन्हे शाखा पीआय संदिप पाटील, पिंपळगांव हरेश्वर एपीआय प्रकाश काळे, पीएसआय शेखर डोमाळे, शरद बागल, विठ्ठल पवार, पो.उप.निरी. प्रकाश पाटील, सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, भरत पाटील, महेश सोमवंशी, पोहेकॉ. नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, सागर पाटील सदर प्रकरणाचा पुढील तपास पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय प्रकाश काळे हे करीत आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.