• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

editor desk by editor desk
June 7, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

पुणे  : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर विरोधकांनी टीका केलीच आहे, परंतु आता शिंदे गटाच्याच आमदाराने घरचा आहेर दिला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. लोकांवर असा कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा ते पैसे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करा, असा सल्ला गायकवाड यांनी दिला आहे.

रायगड येथे माध्यमांशी बोलताना संजय गायकवाड म्हणाले, 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. शिवरायांची भक्ती आणि कीर्ती ही ओसांडून वाहत आहेत. राजेंची कीर्ती जगात पसरलेली आहे. रायरीचा डोंगर राजेंनी किल्ले रायगडसाठी निवडला. या ठिकाणी 350 इमारती असलेला किल्ला कमी कालावधीत उभारला गेला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांना जर का दीर्घायुष्य लाभले असते तर देशात निजाम मुघल, पोर्तुगीज, कुतुबशाह हे कोणीच शिल्लक राहिले नसते. मराठ्यांनी पराक्रम करून संपूर्ण भारतभूमी 1750 पर्यंत मोघलरहीत केली.

पुढे बोलताना संजय गायकवाड यांनी किल्ल्यांवर येणाऱ्या तरुणांना सल्ला देताना म्हणाले, खऱ्या शिवभक्तांना शिस्त सांगण्याची गरज नाही. गड किल्ल्यांवर आपल्या प्रेमिकेचे नाव आणि इतर विटंबना करणाऱ्या तरुणांनी तसे करू नये. गडकिल्ल्यांचे पुनर्वैभव प्राप्त होणे गरजेचे आहे. कोट्यवधीच्या योजना लोकांवर उधळण्यापेक्षा तेच पैसे राजांच्या गडकिल्ला संवर्धनासाठी वापरा, असा सल्ला देत त्यांनी अप्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेवरच टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या लाखो करोडो महिलांची अब्रू कुंकू वाचवल त्या राजांचे किल्ले कधी तुम्ही सलामत ठेवणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले, एकत्र आल्यास काहीच फरक नाही पडणार. कारण आता वेळ निघून गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा मार्ग सोडून कॉंग्रेसचा मार्ग पकडल्याने मुंबईची जनता त्यांना स्वीकारेल का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

 

Previous Post

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

Next Post

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

Next Post
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

जळगावात लाच घेताना महिला अधिकारी रंगेहाथ अटक

July 24, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू; दुसरा जखमी, डंपर चालकावर गुन्हा दाखल !

July 24, 2025
मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !
क्राईम

मंत्री महाजन व आ.खडसेंची फेसबुकवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !

July 24, 2025
कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !
राजकारण

कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक; राज्यभरात प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन !

July 24, 2025
माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?
कृषी

माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?

July 24, 2025
भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !
क्राईम

भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !

July 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp