जळगाव प्रतिनिधी । शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील राजाराम मंगल कार्यालयात नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सामुहिक व्रतबंध सोहळा मंगळवारी १२ एप्रिल रोजी सकाळी घेण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, नवजीवन शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०२० मध्ये करण्यात आली असून समाज हितासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येते. दरम्यान शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील राजाराम मंगल कार्यालयात मंगळवारी १२ एप्रिल रोजी सामुहिक व्रतबंध सोहळा घेण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हास्तरावर घेण्यात आला असून या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ठिकाणातील तेरा बटुंची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जोशी, कृणाल अत्रे, आनंद जोशी, विवेक जोशी, दिपक काळे, देवा काळे, केतन काळे यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवरांनी परिश्रम घेतले.