जळगाव : प्रतिनिधी
कर्ज वाढल्याने तणावात असलेल्या गणेश अशोक पाटील (४३, रा. वडली, ता. जळगाव) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (२ जून) दुपारी वडली येथे घडली. घराबाहेर बसलेली पत्नी बोलविण्यासाठी गेली त्यावेळी तिला पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
सविस्तर वृत्त असे कि, गणेश पाटील यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. ते फेडण्याची विवंचना होती. त्यांनी शेती विकण्याचेही बोलून दाखविले होते. सोमवारी दुपारी, गणेश यांनी गळफास घेतला. पत्नी चहाला म्हणून बोलविण्यासाठी गेली असता पतीने गळफास घेतलेला होता. गणेशला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.