• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

editor desk by editor desk
June 2, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार, आगामी निवडणुकींच्या तयारीला वेग आला असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत. या निवडणुकांसाठी चार आठवड्यांमध्ये प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात देखील केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. निवडणुकींच्या तारखा आणि इतर तपशील लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

सुप्रीम कोर्टाने मागच्या महिन्यात राज्य सरकारला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. तसेच ४ आठवड्यात आधीसूचना जारी करण्यासही सांगितले होते. त्यानुसार आता राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग रचनेचे अधिकार महाविकास आघाडीच्या काळात सरकारने स्वत:कडे घेतले होते. आता प्रभाग रचना पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.

दरम्यान, राज्याच्या राजकीय वर्तुळातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप, शिवसेनेकडून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु केली असून भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मुंबई पालिका निवडणुकीत 100 जागांची मागणी केल्याचेही बोलले जात आहे.

 

Previous Post

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

Next Post

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

Next Post
जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळणार !

June 4, 2025
भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group