• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

editor desk by editor desk
June 2, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

नागपूर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आता त्यांनी काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा इशारा दिला आहे.  विशेषतः जे कंत्राटदार योग्य आणि गुणवत्तापूर्ण काम करत नाही, त्यांना गडकरींनी सुनावले आहे. कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार आहे. तांत्रिक आणि आर्थिक पात्रता यापूर्वी कंत्राटदार ठरवायचे. काळा कोट घालून जो यायचा त्यालाच कंत्राट मिळेल, एवढेच ठरवायचे बाकी राहिले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

पारदर्शकता, भ्रष्ट्राचारमुक्त व्यवस्था, जलदगती निर्णय घेण्याची क्षमता आणि गुणवत्तापूर्ण काम आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.  नागपूरमधील ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, ”ब्रह्मपुत्रा नदीत पाण्याखालून १२ हजार कोटी रुपये खर्चून बोगदा बांधण्यात येणार आहे. हा खर्च कमी करण्यासाठी गेले वर्षभर मी प्रयत्न केले. त्यासाठी तांत्रिक, आर्थिक विषयांचा अभ्यास केला.”  याआधी गडकरी यांनी, देशातील वाढते रस्ते अपघात आणि त्यामुळे होत असलेल्या मृत्यूंच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी या रस्ते अपघातांना सिव्हिल इंजिनिअर्स, सल्लागार आणि सदोष सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) जबाबदार असल्याचे म्हटले होते.

खराब रस्त्यांबद्दलही व्यक्त केली होती चिंता

खराब रस्त्याची बांधणी केल्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवला यावा. या अपघातांसाठी रस्ते बांधणी करणारे कंत्राटदार आणि अभियंत्यांना जबाबदार धरावे आणि त्यांना तुरुंगात पाठवावे, असाही इशारा त्यांनी दिला होता. वाढत्या रस्ते अपघातांच्या समस्येला तोंड द्यावे लागणे ही आपल्यासाठी चांगली गोष्ट नाही. देशात दरवर्षी ४ लाख ८० हजार रस्ते अपघात होतात. तर त्यात १ लाख ८० हजार मृत्यू होतात. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहेत. यापैकी ६६.४ टक्के मृत्यू हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. यामुळे जीडीपीचे ३ टक्के नुकसान झाले आहे. रस्ते अपघातात डॉक्टर, अभियंते आणि महत्त्वाच्या व्यक्ती, प्रतिभावान तरुणांचा मृत्यू होणे हे आपल्या देशासाठी खरोखरच मोठे नुकसान आहे, अशी खंतही गडकरी यांनी याआधी व्यक्त केली होती.

 

Previous Post

भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

Next Post

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

Next Post
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळणार !

June 4, 2025
भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group