• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

editor desk by editor desk
May 30, 2025
in कृषी, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा त्यांच्या सडेतोड आणि थेट शैलीमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यावर पंचनाम्यांची मागणी होत आहे. मात्र, कोकाटे यांनी दिलेलं “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे.

मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान केले असून, यामध्ये कांद्याचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला होता, पण आर्द्रतेमुळे कांद्याला बुरशी लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून कापणी झालेल्या पिकांचाही पंचनामा करावा, अशी मागणी होत असताना कोकाटे यांनी “हार्वेस्टिंग झालेलं आहे तिथे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असा थेट सवाल केला. त्यांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय आपत्ती निधीच्या नियमानुसार फक्त उभ्या पिकांनाच मदत मिळते, घरात किंवा चाळीत ठेवलेल्या कांद्याला नाही.

शेतकऱ्यांना कांदा वाचवण्यासाठी साठवलेला कांदा पुन्हा बाहेर काढून निवडावा लागतो, जो खर्चिक आणि कष्टसाध्य प्रकार आहे. वाढलेल्या मजुरी दरांमुळे साठवणुकीचा खर्चही गगनाला भिडत आहे.

कोकाटे यांच्या वक्तव्यावर समाजमाध्यमांतून आणि शेतकरी संघटनांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी त्यांच्या स्पष्टपणाचं कौतुक केलं, तर काहींनी “ढेकळांचे पंचनामे” हे विधान शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारे असल्याचं म्हटलं आहे. पावसामुळे होणाऱ्या नुकसानात भरपाई मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना, नियमांच्या चौकटीत अडकलेली शासकीय मदत आणि त्यावर कोकाटेंचं बिनधास्त मत या दोहोंमुळे राज्यात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

 

Previous Post

धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

Next Post

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !

Next Post
पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !

पोलिसांची मोठी कारवाई : फरार आरोपी नीलेश चव्हाणला ठोकल्या बेड्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !

May 31, 2025
उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group