• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

editor desk by editor desk
May 30, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
धक्कादायक : दोन महिन्यांपासून आत्याला भाच्याने साखळदंडात ठेवले बांधून !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात महिलांबाबत धक्कादायक घटना घडत असतांना आता कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी येथे एक धक्कादायक उघडकीस आली आहे. एका चाळीस वर्षीय महिलेला तिच्या भाच्याने साखळदंडाने बांधून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, क्राइम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी साखळदंडातून सदरील महिलेची सुटका केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजारामपुरी परिसरामध्ये एका महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात आले आहे. सारिका साळी असे या चाळीस वर्षीय महिलेचे नाव असून पोलिसांनी या महिलेची सुटका केली आहे. संबंधित महिला ही वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिच्या घरच्या मंडळींनी तिला दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी कुलूप फोडणाऱ्या व्यक्तीला बोलावून या महिलेची सूटका केली.

सदरील महिला ही तिच्या भाच्याजवळ राहते. यात तिचा भाऊ आणि भावाची बायको म्हणजेच भावजय आणि भाचा हे सर्व एकत्र राहतात. मात्र गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून या महिलेला साखळदंडात बांधून ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळतात शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित महिलेला साखळदंडात बांधणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते संजय पवार यांनी यात सदरील महिलेला बांधून ठेवणाऱ्या भाच्याच्या देखील कानशिलात लगावली आहे. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

 

Previous Post

काळजी घ्या : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले तर ७ जणांचा मृत्यू !

Next Post

कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

Next Post
कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

कृषीमंत्र्यांचे धक्कादायक विधान : “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात : परिवारातील तीन ठार तर दोन गंभीर !

May 31, 2025
उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group