मुक्ताईनगर : प्रतिनिधी
पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. ही घटना मुक्ताईनगर-खामखेडा रस्त्यावर गुरुवारी रात्री घडली. यात वाहन चालकास अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, या अपघातात पुंडलिक रामकृष्ण कोळी (५४) आणि भागवत महारू कोळी (६२) या दोघांचा मृत्यू झाला. भागवत कोळी हे शिंदे सेनेचे तालुका उपप्रमुख होते. मुक्ताईनगर पोलिसात लखन वसंत मोरे राहणार लोहारखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की, गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर खामखेडा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ पिकअप व्हॅनने दुचाकीला धडक दिली. यात वरील दोन जण ठार झाले. पिकअप वाहन चालक धर्मेंद्र नंदकिशोर साहू (रा.इंदूर) यास अटक करण्यात आली आहे. नायगाव येथे शुक्रवारी दुपारी एकाच वेळी अंतिम संस्कार करण्यात आले. दोघांच्या मृत्यूमुळे नायगाव गावावर शोककळा पसरली आहे. मयत भागवत कोळी यांना पत्नी, मुलगा आणि मुलगी तर पुंडलिक कोळी यांच्यापश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.