यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील महेलखेडी येथील महिलेने पतीसोबत जात असताना गाडी थांबविण्यास सांगितले व थेट विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुस्कान अल्ताफ तडवी (२०) ही दुचाकीने पती अल्ताफ रहेमान तडवी (रा. महेलखेडी) यांच्यासोबत दुचाकीवर जात होती. दरम्यान, विरावली गावाच्याजवळ शेत गट क्रमांक ५७ येथे पतीला दुचाकी थांबविण्यास सांगितले, दुचाकीवरून उतरून तिने विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पती अल्ताफ तडवी यांनी आरडाओरड केली. नागरिकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले. यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतीने तिला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.