• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : जिल्ह्यातील तापी नदीत गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन !

editor desk by editor desk
May 16, 2025
in क्राईम, जळगाव
0
मोठी बातमी : जिल्ह्यातील तापी नदीत गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन !

रावेर : प्रतिनिधी

गेल्या 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.15) रोजी तापी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले. मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शांततेत आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

जलसमाधी आंदोलनात शंभरहून अधिक शेतकरी, महिलांचा मोठा सहभाग होता, तर काही वयोवृद्ध नागरिकांनीही उपस्थिती लावली. हातात फलक घेऊन नदी पात्रात उतरलेल्या ग्रामस्थांनी “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही” अशी ठाम भूमिका घेतली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान चार नागरिकांना भोवळ आल्याने क्षणभर तणाव निर्माण झाला. त्यापैकी एकाची प्रकृती बिघडल्याने त्याला तत्काळ रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, 26 वर्षांपूर्वी पुनर्वसन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पावसाळ्यात गावात पुराचा मोठा धोका असल्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात येते. त्यामुळे त्वरित पुनर्वसन व्हावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे.

“आमच्या घरांचे पुनर्वसन झालेले नाही. वर्षानुवर्षे आम्ही केवळ आश्वासनांवर जगतो आहोत. यापुढे प्रशासनाने थेट कारवाई करावी. जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी येऊन निर्णय घेईपर्यंत आम्ही नदीबाहेर पडणार नाही,” असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल विभागाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ आपली मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रशासनाने अद्याप ठोस भूमिका घेतलेली नसल्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता जिल्हा प्रशासन या दीर्घकालीन प्रश्नावर कधी आणि कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

आताही शरद पवारांचे ‎‎‎स्वागतच आहे ;  केंद्रीय मंत्री आठवले !

Next Post

जळगावात निघाली भव्य तिरंगा यात्रा !

Next Post
जळगावात निघाली भव्य तिरंगा यात्रा !

जळगावात निघाली भव्य तिरंगा यात्रा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group