Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आताही शरद पवारांचे ‎‎‎स्वागतच आहे ;  केंद्रीय मंत्री आठवले !
    राजकारण

    आताही शरद पवारांचे ‎‎‎स्वागतच आहे ;  केंद्रीय मंत्री आठवले !

    editor deskBy editor deskMay 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटासोबत शरद पवार यांचा गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार शरद पवार आमच्यासोबत आले असते तर‎ देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही पवारांचे ‎‎‎स्वागतच आहे. खासदार पवार‎‎आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ‎‎‎एकत्रच होते, आजही एकत्र आहेत. ‎‎‎अजित पवारांचे म्हणणे एकच होते‎‎की शिवसेना तुम्हाला चालते तर‎‎भाजप का चालत नाही? ते‎प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांद्या लावून‎देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी‎आले असते तर देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. ‎‎अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार व अजित पवार ‎‎एकत्र येऊन एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर‎पवारांचे स्वागतच असल्याचा पुनरुच्चारही केंद्रीय ‎‎सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला.‎

    जालन्यातील आरपीआय कार्यकर्ते गणेश रत्नपारखे‎यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी ते गुरुवारी ‎‎जालन्यात आले होते. पाकिस्तान दहशतवाद्यांना‎प्रोत्साहन देणारा देश आहे. युद्धाची आवश्यकता‎अजिबात नाही, पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला ‎‎पाहिजे, ही आमची भूमिका आहे. युद्ध विरामाची‎विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली असून त्यांनी‎हार मान्य केल्याचेही ते यावेळी म्हणाले.‎

    पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात आला ‎पाहिजे, त्यासाठी युद्ध केलं पाहिजे, वेळ आली तर ‎पाकिस्तान ताब्यात घेतले पाहिजे अशी भूमिका मी ‎अनेकवेळा मांडलेली आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ‎डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाची मध्यस्थी यामध्ये नको ‎आहे. दहशतवादी कारवाया थांबवल्या व पाकव्याप्त ‎काश्मीर आम्हाला सोपवला तर थेट भारत ‎पाकिस्तानबरोबर चर्चा करायला तयार असल्याचे केंद्रीय ‎सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले. ‎

    समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट‎यांच्या खात्याचा गोरगरिबांचा निधी‎लाडक्या बहिणीकडे वळवणे योग्य‎नाही. समाजकल्याण व्यतिरिक्त इतर‎अनेक मोठी खाती आहेत, त्या‎खात्याचा निधी लाडक्या बहिणींकडे‎वळवला पाहिजे. कर्नाटकमध्ये‎सामाजिक खात्याचा निधी कुठे‎वळवता येणार नाही, असा कायदा‎आहे. महाराष्ट्र सरकारनेही तसा‎कायदा करावा. तसेच लाडक्या‎बहिणींना आर्थिक परिस्थिती‎सुधारल्यानंतर २१०० रुपये देऊ असे‎आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र‎फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित‎पवार व एकनाथ शिंदे यांनी दिले‎आहे. लवकरच त्यांना २१०० रुपये‎मिळतील अशी अपेक्षा आहे, असे ‎आठवले म्हणाले.‎

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.