• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आठ दिवसावर लग्न अन भावी नवरदेवाने घेतला टोकाचा निर्णय !

editor desk by editor desk
May 14, 2025
in क्राईम, जळगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील एका गावातून एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचे आठ दिवसांवर लग्न आले असताना त्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होते. आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचे वातावरण होते असे असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (वय 21, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवार दि. 13 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणी होणाऱ्या नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाकडी येथे आई, वडील, दोन भावांसह राहणारा अमोल पाटील हा वडिलांना शेती कामात मदत करत होता. अमोल याचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले होते. दि.20 मे रोजी हळद आणि दि. 21 मे रोजी लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती. सोमवार दि. 12 मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो शेतात गेला. नंतर घरी परतलाच नाही. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हा शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अमोल याला मृत घोषित केले. लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कारण काय होते, लग्न जवळ आले असताना त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

 

Previous Post

देणगीदारांना शिर्डीत साई संस्थानच्या नव्या सेवा-सुविधा…

Next Post

धरणगावात प्रौढाने आयुष्य संपविले !

Next Post
आईने ‘शाळेत जा’ म्हटल्याने संतापलेल्या नववीतील मुलाने घेतला गळफास

धरणगावात प्रौढाने आयुष्य संपविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group