Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पाकिस्तानच्या कुरपती वाढल्या : जवानाला आले वीरमरण !
    क्राईम

    पाकिस्तानच्या कुरपती वाढल्या : जवानाला आले वीरमरण !

    editor deskBy editor deskMay 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारात जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. रविवार (11 मे) रोजी जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात आतापर्यंत पाच जवानांना वीरमरण आले आहे.

    जम्मू सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ‘आम्ही 10 मे 2025 रोजी आर एस पुरा क्षेत्रातील, जिल्हा जम्मू येथे अंतराष्ट्रीय सीमारेषेवर क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये बीएसएफचे बहादुर सब इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती प्राप्त झाली. देशसेवेच्या रक्षणात मोहम्मद इम्तियाज यांनी सर्वोच्च बलिदान दिलं असून त्यांच्या शौर्याला सलाम!’ असे सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्वटिर अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.

    दरम्यान, पहलगाम हल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने भारतावर वारंवार हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे प्रयत्न भारताने हाणून पाडले.

    10 मे 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली. पण काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा सीमावर्ती भागात गोळीबार केला. त्यामुळे पुन्हा एकदा पाकड्यांचे नापाक कारनामे समोर आले आहेत.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    काँग्रेस संपत नाही ; रोहित पवारांनी पार्थ पवारांचे विधान फेटाळले !

    April 7, 2026

    तळीरामांसाठी महत्वाची बातमी : जिल्ह्यात ‘या’ दिवशी मद्यविक्री बंद

    April 7, 2026

    मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचे पाच मोठे निर्णय !

    April 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.