• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !

editor desk by editor desk
May 9, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी : भारताने फेटाळल्या पाकिस्तानच्या मागण्या !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारत चोखपणे उत्तर देत आहे.  पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. ऑपरेश सिंदूरच्या यशानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी महत्वाची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले दावे आणि मागणी देखील भारताने फेटाळून लावली आहे.

भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये आमचे 26 नागरिक मारले गेले आणि 46 जण जखमी झाले आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता, तसेच आमच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आल्याचं देखील पाकिस्तानने म्हटलं होतं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संयुक्त चौकशी करा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली होती, मात्र ही मागणी आणि दावे भारतानं फेटाळून लावले आहेत.

 

विक्रम मिसरी काय म्हणाले ?   

7 तारखेच्या स्ट्राईकमध्ये नागरिक मारल्याचं पाकिस्तानकडून सांगितलं जातं. पण आम्ही टार्गेट ठेवून हल्ला केला होता. काल दहशतवाद्यांचा दफनविधी होता. त्यात कोणताही सिव्हिलियन मारला गेला नसल्याचं स्पष्ट होतं. माझ्या हातात फोटो आहे. त्यात पाकिस्तानी अधिकारी आहेत. पाकिस्तानी ध्वज आहेत. मारलेल्या दहशतवाद्यांना स्टेट हॉनर दिला गेला याचं मला आश्यर्य वाटलं. भारताने धार्मिक स्थळांवर हल्ला केल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानचा हा दावा चुकीचा आहे. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळांवरच हल्ला केला आहे. दुर्देवाने पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी  धार्मिक स्थळांचा सहारा घेत आहे, असं मिसरी यांनी म्हटलं होतं. दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संयुक्त चौकशी व्हावी अशी मागणी पाकिस्तानने केली होती, मात्र ती मागणी देखील भारतानं फेटाळून लावली आहे, 26/11 आणि पठाण कोट हल्ल्यानंतर सर्व पुरावे देऊन देखील पाकिस्तानचं अपेक्षित सहकार्य मिळालं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

Previous Post

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

Next Post

पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !

Next Post
पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !

पोलीस पथकाला मोठे यश : आंतरराज्यीय चारचाकी वाहन चोरणाऱ्या टोळीला जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group