• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !

editor desk by editor desk
May 8, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
महत्वाची बातमी : देशातील ‘हे’ विमानतळ आदेश येईपर्यत बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या आतंकी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, भारताने पाकिस्तानवर हल्ला केलाय.  आज सकाळी लवकर “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ ठिकाणी हवाई हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद मुख्यालय व मुरीदकेमधील लष्कर-ए-तैयबा मुख्यालय ही मुख्य लक्ष्य होती. हल्ल्याचे नियोजन इतके गुप्त होते की पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने कराची व लाहोरचा एअरस्पेस बंद केला आहे. भारतातही सुरक्षा कारणास्तव श्रीनगर (SXR), जम्मू (IXJ), अमृतसर (ATQ), लेह (IXL) आणि धर्मशाळा (DHM) येथील विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत.

इंडिगो एअरलाइन्सने म्हटले की, “हवाई क्षेत्रातील बदलत्या स्थितीमुळे आमच्या अनेक उड्डाणांवर परिणाम झाला आहे.” स्पाईसजेटने देखील जाहीर केले की, “सध्याच्या परिस्थितीमुळे उत्तरेतील अनेक विमानतळ बंद करण्यात आले असून, प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाची योजना पुन्हा आखावी.”

UN महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी या लष्करी कारवाईबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले की, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही लष्करी संघर्ष संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकतो. दोन्ही देशांनी संयम पाळावा.” भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे प्रादेशिक तणाव वाढला आहे. हवाई सेवा व प्रवाशांवर त्याचा मोठा परिणाम झाला असून, पुढील काही दिवस हे संकट कसे मार्गी लागते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

अजित पवारांसोबत जाण्याचा सुळे घेणार निर्णय : शरद पवारांची माहिती !

Next Post

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

Next Post
अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group