Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नागरिक उकाडयाने हैराण : अनेक भागात गारपिटीचा इशारा !
    कृषी

    नागरिक उकाडयाने हैराण : अनेक भागात गारपिटीचा इशारा !

    editor deskBy editor deskMay 3, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील काही भागातील तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. यातच आता उकाडयाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही पावसाचा तडाखा राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    ऑरेंज अलर्ट जारी 

    तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात 4 तारखेपासून ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ मे रोजी नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

    येलो अलर्ट जारी 

    याशिवाय यवतमाळ, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आदी भागांत येलो अलर्ट जारी आहे.  या ठिकाणीविजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश भागात हवामान ढगाळ राहील. दरम्यान, आजपासून 5 मे या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागांत हवामानात मोठे बदल होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अवकळी पावसामुळे पिकांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.