• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दहशतवाद्यांना शोधून ठेचणार ; केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला इशारा !

editor desk by editor desk
May 2, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
दहशतवाद्यांना शोधून ठेचणार ; केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिला इशारा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील जम्मू  काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन उत्तर दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीमध्ये दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये संबोधित करताना दहशतवादाविरोधात सरकारचा ‘झीरो टॉलरन्स’ असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार कोणत्याही दहशतवाद्याला सोडणार नाही, असे शहा म्हणाले.

1990 च्या दशकापासून काश्मीरमध्ये दहशतवाद चालवणार्‍यांविरुद्ध पंतप्रधान मोदींनी ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सरकार त्यांच्याविरुद्ध जोरदार लढा देत आहे. देशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारचा संकल्प आहे आणि तो पूर्ण होईल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. हा भ्याड हल्ला करून हा त्यांचा मोठा विजय झाला आहे, असे गुन्हेगारांना वाटत असेल, तर एक गोष्ट समजून घ्या, हे नरेंद्र मोदी सरकार आहे. कोणालाही सोडले जाणार नाही, असे शहा म्हणाले.

गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. हे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख नाही, तर संपूर्ण देशाचे दुःख आहे. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेतो. जर गुन्हेगारांना वाटत असेल की, ते जिंकले आहेत; तर ते चुकीचे आहेत. प्रत्येक नुकसानीचा बदला घेतला जाईल, असे ते म्हणाले. देशाच्या कोणत्याही भागात दहशतवाद टिकू दिला जाणार नाही आणि तो मुळापासून नष्ट केला जाईल. भारतातील 140 कोटी जनता दहशतवादाविरोधात सरकारसोबत आहे. जगभरातून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा आहे, असे अमित शहा म्हणाले.

 

Previous Post

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली !

Next Post

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी गंभीर जखमी !

Next Post
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी गंभीर जखमी !

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण-तरुणी गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group