अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील गांधलीपुरा भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोघांना मारहाण केल्याची घटना घडली होती. दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील गांधलीपुरा येथील सिद्धार्थ चौक परिसरात धीरज सुनील देवरे हा १६ रोजी रात्री व्यायाम करून दुचाकीने घरी जात असताना साहिलने शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. बाजूला उभे असलेले त्याचे मित्र अल्तमश, आकीब, अदनान यांनीही लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. १६ रोजी नातेवा-इकांचे लग्न आटोपून घरी जात असताना धीरज देवरे याने आपल्याकडे मोबाइल नंबरची मागणी केली. ही बाब घरी सांगि-तल्यावर साहिल शेख हारू याने त्याला समजविण्यासाठी त्याच्या घरी गेला असता त्याला धीरज देवरे याने मारहाण केली. रात्री १० वाजता धिरज देवरे, पंकज देवरे व सुनील देवरे यांनी तुम्हाला येथे राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.