• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? ; खा.उदयनराजे भोसले संतापले !

editor desk by editor desk
April 15, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? ; खा.उदयनराजे भोसले संतापले !

सातारा :  वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निवडण्यात आलेली अरबी समुद्रातील जागा नैसर्गिकदृष्ट्या अयोग्य आहे. मुंबईत राजभवनाची 48 एकर जागा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा गव्हर्नर मोठा आहे का? त्यामुळे राजभवनाच्या जागेपैकी 40 एकर जागा शिवस्मारकासाठी उपलब्ध करावी. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला साजेसे शिवस्मारक शासनाने उभे केले पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी केली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर उदयनराजेनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन, राज्य शासनाला खडा सवाल केला. यावेळी रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा वायदंडे, आप्पा तुपे आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने अनेक वर्षे राज्य आणि देशावर राज्य केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पक्षाची वाटचाल सुरू केली. काँग्रेस आणि शिवसेना या दोघांकडेही सरकार असताना, खरे तर त्यांनीच शिवस्मारकाचा प्रश्न लावायला पाहिजे होता; परंतु तसे झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अरबी समुद्रात निवडलेली जागा नैसर्गिकदृष्ट्या योग्य नाही. मुंबईसारख्या ठिकाणी राज्यपालांच्या नावावर राजभवनाची 48 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक झाले, तर ते योग्य ठरेल. यातील 40 एकर जागा शिवस्मारकासाठी आरक्षित करण्यात यावी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे समाजात एकी टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊनच त्यांनी घटना लिहिली. बहुजन समाजातील लोकांनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन, आपण आपले विचार व्यापक करत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे. महिला, लहान मुले, उपेक्षित समाज यांचा पूर्ण विचार करून, बाबासाहेबांनी अतिशय बारकाव्याने घटना लिहिली. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारच्या राजवाड्यात झाल्याचा मला विशेष अभिमान आहे.

लोकांनी कितीही डांगोरा पिटला, तरी संविधानाला धोका निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सातार्‍यात ज्या घरामध्ये राहत होते, ते घर शासनाने लवकरच ताब्यात घ्यावे. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या आठवणी जपण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार आहे. सातारच्या राजवाड्याचेही संगोपन व्हावे, यासाठी हेरिटेज आर्किऑलॉजिकल विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू आहे. अशा वास्तू पुन्हा बांधून होणार नाहीत. त्यामुळे या संदर्भात शासनाने पावले उचलावीत.

समाज घडवण्यात महात्मा फुले, लहुजी वस्ताद यांचे योगदान मोठे आहे. त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. त्यांचाच आदर्श घेऊन, महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली, हे लक्षात घ्यायला हवे. महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी जी संपत्ती कमावली, ती लोकांसाठी खर्च केली. त्यामुळे त्यांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही, असे मतही उदयनराजेंनी व्यक्त केले.

 

Previous Post

मंत्री महाजनांनी दिली खडसे व पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रुनुकसानीची नोटीस !

Next Post

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ ५०० रुपये !

Next Post
मोठी बातमी : लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ ५००  रुपये !

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना आता मिळणार केवळ ५०० रुपये !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group