• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरेंच्या नेत्याचा थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल !

editor desk by editor desk
April 13, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
ठाकरेंच्या नेत्याचा थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेते महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतांना आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले कि, संविधान खरेच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचे राज्य नाही, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. नाशिक येथे शनिवारी भगवान महावीर जनकल्याण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरविंद सावंत यांनी भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर भाष्य केले.

अरविंद सावंत म्हणाले, संसदेत पूर्वी विरोधकांना पण ऐकले जात होते. तेव्हा प्रसिद्धी माध्यमे वेगळी होती. दूरदर्शन आले आणि क्रांती झाली. नवनवे प्रसिद्धी माध्यमे आली आणि त्यानंतर लोकशाहीचे प्रश्न निर्माण झाले. मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले, तेव्हा वाटले लोकशाहीचा आता सन्मान होईल. एक रेल्वे अपघात झाला तर लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, मात्र इथे तर रेल्वेचे एवढे अपघात झाले, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

पुढे बोलताना अरविंद सावंत म्हणाले, संविधान खरच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचे राज्य नाही. मुंबईतली बिल्डिंग कोसळी तरी चर्चा झाली नाही, कुंभमेळ्यात एवढी लोक गेली त्याचे काय झाले? आम्हाला तर 30 चाच आकडा सांगितला होता. आम्हाला सभागृहात चर्चा करू दिली नाही. 2014 पूर्वी जीएसटीला कोणी विरोध केला? आधार कार्डला कोणी विरोध केला होता? जेव्हा रुपयामध्ये घसरण सुरू होती, तेव्हा हे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काय बोलले होते? कायदा करतात त्यातून न्याय द्यायचा आहे की त्रास?, असा सवाल सावंत यांनी केंद्र सरकारवर उपस्थित केला आहे.

अरविंद सावंत म्हणाले, राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा का आणला? त्यानुसार दोन तृतीयांश सदस्यांना पक्षांतर करता येते, असा नियम बनवला आहे. मात्र हे दोन तृतीयांश कुठे गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, तिथे कोणाचे राज्य आहे? असा सवालही सावंत यांनी विचारला. भाजपमध्ये आता छोट्या मनाची माणसे आहेत. आता देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे, असा भ्रष्टाचार करतात की समजत पण नाही, अशी टीका देखील अरविंद सावंत यांनी यावेळी केली.

 

Previous Post

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जिवे ठार मारण्याची धमकी

Next Post

राज्यातील बाप्पांच्या दर्शनासाठी आता लागणार ड्रेस कोड !

Next Post
राज्यातील बाप्पांच्या दर्शनासाठी आता लागणार ड्रेस कोड !

राज्यातील बाप्पांच्या दर्शनासाठी आता लागणार ड्रेस कोड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group