• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राऊतांना झाले भाजप द्वेषाची कावीळ ; मंत्री बावनकुळे !

editor desk by editor desk
April 1, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राऊतांना झाले भाजप द्वेषाची कावीळ ; मंत्री बावनकुळे !

नागपूर : वृत्तसंस्था

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण असेल? मग तो महाराष्ट्रातील असेल का? आणखी कोण? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार असल्याने, ते निवृत्त होऊ शकतात, असे विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार अधोरेखित केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संघाला नेतृत्त्वात बदल हवा आहे, त्यामुळे पीएम मोदी निघून जात असल्याचे म्हटले होते, यावर राज्याचे महसूलमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.

मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भातील सोशल मीडिया एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही”

भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते आदरणीय अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (83 वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असेदेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

 

Previous Post

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या : अंजली दामानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप !

Next Post

रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

रिक्षात बसवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group