• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा घणाघात : मुख्यमंत्री फडणवीसांनी मोह सोडावा !

editor desk by editor desk
April 1, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा घणाघात : मुख्यमंत्री फडणवीसांनी मोह सोडावा !

मुंबई  : वृत्तसंस्था

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यामुळे सर्वच विरोधक राज्यातील गुन्हेगारी फोफावत असतांना गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात कायद्याचा कुणाला धाक राहिलेला नाही. सरकारी आशीर्वादाने वाळू, जमीन, पवनचक्की, मटका, दारू, कोळसा माफिया तयार झाले आहेत. पोलिस आणि गृह विभाग काय करत आहे, फडणवीस यांनी आता तरी गृह खात्याचा मोह सोडून राज्याला पूर्ण वेळ गृह मंत्री द्यावा.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे आमदारच बीडचा बिहार, तालिबान झाल्याचे सांगत आहेत. बीडमध्ये आका, खोक्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच उदयास आले आहेत. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांची मजल इतकी वाढली आहे की आता बीडच्या तुरुंगात टोळीयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळेच महादेव गित्तेसह काही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविल्याचे वृत्त आहे. त्यामुळे बीडचे तुरुंगही सुरक्षित नसणे ही चिंतेची बाब आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, खून, दरोडे बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढूनही आरोपींना अटक होत नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करावे लागते ही राज्याला शरम आणणारी बाब आहे. गुन्हेगार दररोज पोलिसांना आव्हान देत आहेत.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात भाजप युतीचे सरकार येण्याआधी देशभरात महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचे उदाहरण दिले जायचे. महाराष्ट्र शांत आणि प्रगतिशील राज्य असल्याने मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत होते. त्यामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली. पण गेल्या काही दिवसांत सरकारच्या आणि विशेषत: गृहविभागाच्या गलथानपणामुळे महाराष्ट्राच्या नावाला काळिमा लागला असून महाराष्ट्राची तुलना उत्तरेतल्या राज्यातील जंगलराजसोबत होऊ लागली आहे.

 

Previous Post

पायावरून चाक नेल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार !

Next Post

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या : अंजली दामानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप !

Next Post
शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या : अंजली दामानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप !

शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या : अंजली दामानियांचे मुंडेंवर गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group