• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आमदार होणे सोपे, सरपंच होणे एवढे सोपे नाही ; पालकमंत्री पाटलांची जोरदार फटकेबाजी !

editor desk by editor desk
March 30, 2025
in जळगाव, राजकारण, राज्य
0
आमदार होणे सोपे, सरपंच होणे एवढे सोपे नाही ; पालकमंत्री पाटलांची जोरदार फटकेबाजी !

जळगाव : प्रतिनिधी

शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांची आज जळगावमध्ये जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली. सध्या लाडक्या बहिणी सरपंच आहेत, नवऱ्यांना माझी विनंती आहे की गावच्या कारभारात डोकावू नका, महिलांना थोडे काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे राहा, तुमचे काम तेच आहे. बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, मग ती सरपंच झाली तर तिच्या मागे उभा रहा ना काय फरक पडतो, पतीचे काम हे फक्त प्रॉम्टिंग कराचे आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

सरपंच किती काम करतो, हे पोस्टरवर नव्हे जमीनीवर दिसला पाहिजे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. काही लोक बॅनर लावतात कार्य सम्राट, भावी आमदार वगैरे -वगैरे पण त्याच्या गावातील गटार ओसांडून वाहत असेत तरी देखील त्याचे लक्ष नसते, वा रे वा सरपंच असा टोलाही त्यांनी लगावला. पोस्टरबाजी करण्यापेक्षा 50 टक्के तरी त्या गावात प्रत्यक्षात तेथील सरपंचाचे काम असले पाहिजे. पाणी पिऊन पिऊन लोक शिव्या देतात, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

आमदार होणे सोप आहे. पण सरपंच होण एवढे सोप नाही. आमदाराचे कसे असते, या गावात मत भेटले नाही तर त्या गावात भेटते. पण सरपंचांचे तसे नाही, मेरे बाप को उसके बापने गिराया था असे असते, चुन चुन के बदला लेगे, शेत विकून टाकेल पण त्याला पाडूनच टाकेल, अशी मानसिकता सरपंचपदाच्या निवडणुकीत असते. मी भरपूर असे सरपंच पाहिले की, त्यांनी गावासाठी खूप कामे केली, मात्र पुढच्या वेळी विचारले काय झाले? तर ते सांगतात, संपूर्ण पॅनल पडले. मला वाटते ग्रामपातळीवर सुध्दा सामाजिक विचार करण्याची जी मानसिकता आहे, ती बदलली पाहिजे, जो काम करेगा वही राज करेगा, अशी मानसिकता सर्वांमध्ये झाली पाहिजे, त्याशिवाय विकासाचे हे पर्व चालू शकत नाही, असेही पाटील म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणूक जो जिंकतो तो महामंडलेश्वर असतो. 4 लाख लोकांमधून निवडून येणे सोपे आहे, पण 1 हजार लोकांमधून 600 मते घेणे देखील अवघड आहे. सरपंच आणि विरोधक एकाच टपरीवर चहा पिले म्हणजे गावाचे कल्याण झाले असे समजा, त्यामुळे विरोधकांना पटवा, असे गुलाबराव पाटील म्हणाले. ज्या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक एकाच मोटारसायकलवर फिरताना दिसला, समजा ती ग्रामपंचायत पहिली आली, शेवटी चार कामांमध्ये फिफ्टी फिफ्टी होणारच. सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांना माझी विनंती आहे, की सरपंच निवडून आलो तरी मी गावाचा आहे आणि पडलो तरी मी गावाचा आहे, अशा ग्रामपंचायतींचा 100 टक्के विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

 

Previous Post

पारंपारिक पोशाखात पंतप्रधान मोदींचे नागपुरात स्वागत

Next Post

देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

Next Post
देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group