जळगाव : प्रतिनिधी
मालवाहू वाहनाने अनिता राजू गवळी (वय ४५, रा. कांचनगर) यांना धडक देण्यासह पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना दि. १९ मार्च रोजी सुभाष चौक परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर परिसरात अनिता गवळी या वास्तव्यास आहे. त्या दि. १९ रोजी घरी परतत असताना त्यांना (एमपी ४६, झेडई ९९६४) क्रमाकाच्या मालवाहू वाहनाने धडक दिली. तसेच या वाहनाचे चाक महिलेच्या पायावरून गेल्याने जबर दुखापत झाली. या प्रकरणी महिलेने दि. २४ मार्च रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.