जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी विजय रमेश चव्हाण (वय २८) हे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागून ठार झाले. ही घटना सोमवारी (१७ मार्च) रात्री दापोरा शिवारात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेळीपालन करणारे विजय चव्हाण यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले, मात्र ते पत्नीपासून विभक्त राहत होते. सोमवारी रात्री दापोरा शिवारात रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेची धडक लागल्याने ते ठार झाले. मयताच्या पश्चात आई, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.