• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले : पंतप्रधान मोदी !

editor desk by editor desk
March 18, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले : पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संपूर्ण जगाने महाकुंभ मेळ्याच्या रूपात भारताची भव्यता पाहिली. महाकुंभात आपण राष्ट्रीय जागृतीचे साक्षीदार आहोत, जे नवीन कामगिरीला प्रेरणा देईल. यामुळे आपल्या सामर्थ्यावर शंका घेणाऱ्यांनाही योग्य उत्तर मिळाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान मोदींनी महाकुंभाच्या आयोजनावर भाष्य केले. यावेळी त्यांनी या कार्यक्रमात योगदान देणाऱ्यांचे आभार मानले.

लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या वर्षी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याने आपल्या सर्वांना पुढील एक हजार वर्षांसाठी देश कसा तयारी करत आहे, याची जाणीव करून दिली. या वर्षी महाकुंभाने आपल्या विचारांना आणखी बळकटी दिली आहे. देशाची ही सामूहिक जाणीव आपल्याला देशाच्या ताकदीबद्दल सांगते. मानवी जीवनाच्या इतिहासात असे अनेक वळण येतात, जे भावी पिढ्यांसाठी उदाहरण बनतात. आपल्या देशाच्या इतिहासातही असे काही क्षण आले आहेत, ज्यांनी देशाला जाणीव करून दिली.

महाकुंभावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकुंभात लोकांनी सोयी किंवा गैरसोयीची चिंता न करता सहभाग घेतला. आपल्या परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आहेत. आज भारतातील तरुणाई अभिमानाने आपली परंपरा, श्रद्धा आणि चालीरीती स्वीकारत आहे. एक देश म्हणून आम्हाला मोठी उद्दिष्टे साध्य करण्याचा आत्मविश्वास मिळाला. आपल्या वारशाशी जोडण्याची परंपरा ही आजच्या भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. महाकुंभात राष्ट्रीय चेतना दिसून आली. देशाच्या सामूहिक जाणीवेचे परिणाम महाकुंभमेळ्यादरम्यान दिसून आले. महाकुंभावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना त्यांची उत्तरे मिळाली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात आध्यात्मिक चेतना उदयास आली आहे, असे मोदी म्हणाले.

 

Previous Post

ब्रेकिंग : अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची उचल बांगडी

Next Post

२२ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : माहेरच्यांचा गंभीर आरोप !

Next Post
२२ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : माहेरच्यांचा गंभीर आरोप !

२२ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय : माहेरच्यांचा गंभीर आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group